Author: Raj

  • अरण्यॠषी मारुती चितमपल्ली

    अरण्यॠषी मारुती चितमपल्ली

    चित्तमपल्ली यांनी जंगलाचे ६५ वर्षांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव आपल्या २१ पुस्तकांमध्ये संकलित केला आहे, ज्यात दोन विश्वकोशांचा समावेश आहे. ज्ञानाचा हा खजिना इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे, जेणेकरून भारतासह उर्वरित जगातील निसर्गप्रेमींना त्याचा लाभ घेता येईल.

    मारुती चितमपल्ली यांचा जन्म १९३२ साली नागपूर येथे झाला. त्यांचे वडील एका मिलमध्ये काम करत असत​. अर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही चितमपल्ली यांनी स्कॉलरशिप मिळवून शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर कॉलेज शिक्षण घेताना काही अडथळे आले, मात्र नंतर कोइंबतूर येथे फॉरेस्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांना आपल्याला आवडता विषय सापडला आहे याची जाणीव झाली.

    शिक्षण पूर्ण केल्यावर महाबळेश्वरला त्यांची पहिली पोस्टींग झाली. भारत सरकारच्या वनविभागात त्यांनी ३६ वर्षे काम केले. १९९० साली निवृत्त झाल्यानंतरही निसर्गाशी त्यांचा संबंध सुटला नाही. भारतातील जंगलांविषयीचा त्यांचा अनुभव ६४ वर्षांचा आहे.

    वन महाविद्यालयातील प्रशिक्षणादरम्यान, चितमपल्ली यांच्या लक्षात आले की अभ्यासक्रम फक्त​ जंगलाच्या व्यावसायिक पैलूंशी संबंधित आहेत, जसे की लाकडाची लांबी आणि रुंदी, त्याची किंमत इत्यादी. स्वातंत्र्योत्तर भारतात सेवा बजावत असतानाही त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांना निसर्गसौंदर्याची कधी जाणीवही झाली नाही. याउलट चितमपल्ली यांना लेखकाची संवेदनशीलता लाभली होती, ज्यामुळे ते निसर्गाशी एकरूप होऊ शकले. एकदा ते म्हणाले होते, “मी माझ्या आयुष्यात कधीही प्राणी मारला नाही. मी आत्महत्या कशी करू शकतो?” सुरुवातीच्या काळात वनाधिकाऱ्यांनी पक्षी निरीक्षक असणे अपेक्षित नसल्याने त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून त्यांची अनेकदा खिल्ली उडवली जात असे.

    चितमपल्ली यांना निसर्गाविषयी तीव्र कुतूहल आहे. अनेक पक्षी त्यांच्या इंग्रजी नावांनी ओळखले जातात पण त्यांची मराठी नावे अज्ञात आहेत हे त्यांच्या लक्षात आले. संस्कृत भाषा हा पक्षी आणि प्राण्यांच्या वर्णनाचा खजिना आहे, हे लक्षात आल्यावर वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी पंडितांकडून संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. पुढे जर्मन आणि रशियन भाषेतील पक्ष्यांवरील आधुनिक साहित्याची मोठी श्रीमंती लक्षात येताच त्यांनी त्या भाषाही शिकण्यास सुरुवात केली. चितमपल्ली यांना सागरी पक्ष्यांची नावे सापडत नसल्याने ते महाराष्ट्रातील रायगड किनाऱ्यावर सहलीला गेले, मच्छीमारांना भेटले. इंग्रजी पुस्तकांतून पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून त्यांची स्थानिक नावे, मूलस्थाने (हॅबिटॅट​), वर्तन लिहून ठेवायचे.

    गोनिदा आणि नरहर कुरुंदकर यांसारख्या नामवंत मराठी लेखकांना
    भेटल्यावर चितमपल्ली यांना लेखनाची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यांचे पहिले पुस्तक पक्षी जाए दिगंतरा १९८१ मध्ये प्रकाशित झाले आणि ते बेस्ट सेलर ठरले. तेव्हापासून ते सातत्याने लिहीत आहेत. पक्षी कोश आणि प्राणी कोश यांसह २१ प्रमुख ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत​. पक्षीकोशामध्ये ४५०+ पक्ष्यांची सविस्तर माहिती आहे, ज्यात १८ भाषांमध्ये त्यांच्या नावांचा समावेश आहे, तर प्राणीकोशामध्ये ५००+ प्राण्यांची माहिती आहे. सध्या ते मस्त्य कोश आणि वृक्षकोश या पुस्तकांवर काम करत आहेत. नागपूर विद्यापीठातील बीए,एमए मराठी अभ्यासक्रमासाठी त्यांची दोन पुस्तके वाचणे आवश्यक आहे.

    चितमपल्ली यांच्या लिखाणाचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. एकट्याने विश्वकोश लिहिणे किती कठीण काम असेल याची कल्पना करता येईल का? शिवाय इंटरनेट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथे काहीच उपयोग होत नाही कारण या विश्वकोशातील माहिती जंगलातील ६५ वर्षांच्या संशोधनातून गोळा केलेली आहे.

    वैदिक ऋषींनी हंसाच्या घरट्यांचे सविस्तर वर्णन करण्यापासून ते महाभारतातील पक्ष्यांच्या वर्तणुकीच्या सांकेतिक वर्णनापर्यंत पक्षी, प्राणी आणि निसर्ग यांच्या सविस्तर वर्णनांनी संस्कृत वाङ्मय भरलेले आहे. संस्कृत साहित्याचे सखोल ज्ञान असलेल्या चितमपल्ली यांनी या वन्यजीव तपशीलांची पडताळणी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. उदाहरणार्थ, संस्कृत वाङ्मयात चकोर नावाने ओळखला जाणारा पक्षी हा पौराणिक पक्षी आहे, असे सर्वमान्य होते. चकोर हा नेपाळ आणि पंजाबमध्ये आढळणारा खरा पक्षी असून कीटक, मुळं वगैरे खातो हे चितमपल्ली यांनी सिद्ध केले. किंवा ‘नीर क्षीर विवेक’ हे प्रसिद्ध संस्कृत सुभाषित​ म्हणजे पाण्यात खोलवर असलेल्या कमळाचे दाणे फाडण्यासाठी आणि आतील दुधाळ पांढरा पदार्थ चोखण्यासाठी हंस मान बुडवतो तेव्हा त्याच्या वर्तनाचे वर्णन यात केले आहे, हे चितमपल्ली यांनी दाखवून दिले. ‘ऑटर्स’, ‘ग्रे लॅग गूज’ आणि ‘हेरॉन्स’ यांच्यावरील त्यांचे सविस्तर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले आहेत. भारत सरकारच्या सेवेत असताना कर्नाळा पक्षी अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची उभारणी आणि देखभालीसाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. विदर्भातील नवेबांधगाव येथे पक्षी संग्रहालय उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

    हा लेख लिहिण्याचे कारण एक युट्युब व्हिडिओ. बेंगळुरू येथील पक्षी निरीक्षकांची ही अनौपचारिक बैठक होती आणि प्रास्ताविकात त्यांनी भारतातील पक्षी निरीक्षणाच्या इतिहासाविषयी सविस्तर माहिती दिली. चितमपल्ली यांनी या क्षेत्रात दिलेल्या अफाट योगदानाबद्दल ते अनभिज्ञ होते, हे पाहून मी निराश झालो. त्यात त्यांचा दोष नव्हता. या वगळण्यामागचे कारण म्हणजे चितमपल्ली यांच्या पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर झालेले नाही.

    चित्तमपल्ली यांनी जंगलाचे ६५ वर्षांचे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव आपल्या २१ पुस्तकांमध्ये संकलित केला आहे, ज्यात दोन विश्वकोशांचा समावेश आहे. ज्ञानाचा हा खजिना इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतरित होणे गरजेचे आहे, जेणेकरून भारतासह उर्वरित जगातील निसर्गप्रेमींना त्याचा लाभ घेता येईल.

    चितमपल्ली यांना त्यांच्या पुस्तकांसाठी तसेच निसर्ग संवर्धनातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुण्यातील ऍडवेंचर फाऊंडेशनने त्यांच्या सन्मानार्थ ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या पुरस्काराची स्थापना केली आहे. नुकताच त्यांना पद्मश्री या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक जीवन आणि निसर्गाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी समर्पित असलेल्या जीवनाचा हा एक योग्य सन्मान आहे.


    Cover of the Marathi book 'Chakavachandan : Ek Vanopnishad' by wildlife researcher, naturalist, conservator, and successful Marathi writer Maruti Chitampalli.

    चितमपल्ली यांचे जीवन आणि त्यांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती त्यांच्या ‘चकवाचांदण : एक वनोपनिषद’ या पुस्तकातून घेतली आहे.

    Lead image : Rudy and Peter Skitterians from Pixabay

  • वेव्ह्ज २०२५ : करमणूक क्षेत्रात एक नवे पाऊल​

    वेव्ह्ज २०२५ समिट भारताला कंटेंट निर्मितीसाठी एक महत्त्वाचे स्थान बनण्यास मदत करेल​.

    आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपल्या निर्मात्यांची अर्थव्यवस्था एक नवी ऊर्जा आणत आहे.

    पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी

    संगीतक्षेत्रामध्ये सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम कुणाच्या नावावर आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना एक भारतीय म्हणून गर्व वाटतोच​, शिवाय एक मराठी माणूस म्हणूनही अभिमान वाटतो. प्रश्नाचं उत्तर आहे – आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई. २० पेक्षा अधिक भाषांमध्ये ११,००० पेक्षा जास्त गाणी गायलेल्या आशाताईंचं नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेलं आहे. आणि नुकतंच आशाताईंनी त्यांचं नवीन गाणं यूट्यूबवर प्रकाशित केलं आहे.

    गाण्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आशाताई पं. दिनानाथ मंगेशकरांना वंदन करतात​. नंतर ज्यांच्याबरोबर काम करुन त्यांनी अवीट गाणी दिली ते संगीतकार आणि गायक – मदन मोहन जी, सचिनदा, रफी साहेब​, किशोरदा, लतादीदी, आणि अर्थात पंचमदा. गाण्याच्या दुस​ऱ्या भागात आपल्याला त्यांची नात झनाई भोसलेच्या नृत्याची झलक बघायला मिळते. म्हणजे एका अर्थी पं. दिनानाथांपासुन लतादीदी, आशाताईंनी कलेचा जो वारसा जपला आणि वाढवला तो आता नव्या पिढीच्या हाती सुपुर्द केल्याचं एक प्रतीक​.

    व्हिडिओमध्ये जे संगीतकार आणि गायक दिसतात ते आणि जे दिसत नाहीत ते – यात हेमंतदा, शंकर​-जयकिशन​, मुकेशजी, खय्याम साहेब​, जयदेव जी, रविंद्र जैन जी, नावं तरी किती घ्यायची – या सर्वांनी मागच्या शतकात हिंदी संगीताचा जो अमूल्य ठेवा संगीत​ रसिकांना दिला आहे तो अवर्णनीय आहे. ६०-७० वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची गोडी कायम आहे. कॉन्सर्ट असो वा गायनस्पर्धा, मुख्यत्वे हीच गाणी गायली जातात​. गाणी ज्या चित्रपटासाठी केली होती, तो बरेचदा कुणाला माहीतही नसतो पण गाणं मात्र पाठ असतं. ही गाणी कितितरी लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत 1​. आज स्ट्रिमिंगच्या जमान्यातही ऑल इंडिया रेडियोवर देशाच्या कानाकोप​ऱ्यातून या गाण्यांची फर्माईश होत असते 2.

    दरम्यान, गेल्या दोन दशकांत कंटेंट क्रिएशनचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. स्टुडिओच्या देखरेखीखालून न जाता आता आपल्या कलाकृती जगाशी शेअर करू शकणाऱ्या तरुण संगीत कलावंतांच्या निर्मितीची यूट्यूबवर त्सुनामी आली आहे. दिलजीत दोसांझ आणि ग्रॅमी विजेते रिकी केज यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी आंतरराष्ट्रीय पटलावर पाऊल ठेवले असले, तरी अत्यंत प्रतिभावान कलाकारांचा कंटेंट दररोज प्रदर्शित होत असतो.

    केवळ संगीतातच नव्हे, तर विविध क्षेत्रांत आशय निर्मिती करणाऱ्या प्रतिभेच्या या अद्भुत लाटेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत या आघाडीवर मोठी प्रगती करत आहे. गेल्या वर्षी प्रथमच शिक्षण आणि खाण्यापासून ते सामाजिक परिवर्तन आणि कथाकथन अशा विविध क्षेत्रात कंटेंट तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना राष्ट्रीय निर्माते पुरस्कार देण्यात आले होते.

    यावर्षी भारत जगातील पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट किंवा वेव्ह्स २०२५ आयोजित करणार आहे. पंतप्रधान मा. श्री. मोदी जी यांनी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात‘मध्ये सांगितल्याप्रमाणे, वेव्ह्ज 2025 जगभरातील सामग्री निर्माते, चित्रपट निर्माते, टीव्ही उद्योग व्यावसायिक, ऍनिमेशन तज्ञ, गेमिंग किंवा मनोरंजन तंत्रज्ञान इनोव्हेटर्सना संधी ओळखण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी आमंत्रित करेल.

    भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अग्रगण्य बनण्याच्या मार्गावर आहे. वेव्ह्स २०२५ समिट भारताला कंटेंट निर्मितीसाठी एक महत्त्वाचे स्थान बनण्यास मदत करेल​.

    बुद्धिबळात भारतीय महिलांची पुन्हा शानदार कामगिरी

    २०२१ मध्ये आम्हाला वाटले होते की आम्हाला प्रतिभावान बुद्धिबळपटू मिळतील परंतु आता आमच्याकडे एक विश्वविजेती (हम्पी) आणि एक कांस्यपदक विजेती (वैशाली) आहे.

    जीएम विशी आनंद, पाच वेळा जागतिक बुद्धिबळ विश्वविजेते

    भारतीय बुद्धिबळपटू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत​. २०२४ मध्ये भारताने ऑलिंपिकमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर जीएम डी गुकेश खेळाच्या १३८ वर्षांच्या इतिहासात सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता बनला. आणि आता भारताची टॉप रेटेड महिला बुद्धिबळपटू जीएम हम्पी कोनेरूने वर्ल्ड रॅपिड २०२४ महिला चॅम्पियनशिप जिंकली आहे तर जीएम आर वैशालीने वर्ल्ड ब्लिट्झ वुमन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

    जीएम हम्पी कोनेरूने गतविश्वविजेत्या जीएम वेनजुन जू आणि वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन जीएम कॅटरीना लागनो यांच्याविरुद्ध दोन बरोबरी साधल्या आणि अंतिम फेरी आणि विजेतेपद ८.५/११ गुणांसह जिंकले. हे तिचे दुसरे वर्ल्ड रॅपिड विजेतेपद आहे.

    आत कुठेतरी स्वत:चे मूल्य सिद्ध करण्याचा निर्धार माझ्या मनात होता.

    जीएम हम्पी कोनेरू, वर्ल्ड रॅपिड महिला विश्वविजेती

    काही महिन्यांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जीएम आर. वैशाली ने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काळे मोहरे घेऊन जास्तीत जास्त सामने खेळले होते. हे क्रिकेटमध्ये नवीन चेंडूला तोंड देण्यासारखे होते. वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या महिला गटात जीएम वैशालीने उपांत्य फेरीत चीनच्या जीएम झू जिनरचा २.५-१.५ असा पराभव करून ब्राँझपदक पटकावले.

    जीएम वैशाली वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी (वाका) ची प्रशिक्षणार्थी आहे. वाकाने विद्यमान विश्वविजेता जीएम डी गुकेश, जीएम प्राग, जीएम निहाल सरीन आणि जीएम अर्जुन एरिगाइसी यासह अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंना वर्षानुवर्षे सहाय्य केले आहे.

    भारतीय बुद्धिबळाची नेत्रदीपक प्रगती बघता लवकरच भारतीय बुद्धिबळप्रेमींना कोड्यात टाकणारी परिस्थिती येऊ शकेल​. समजा, बुद्धिबळ विश्वविजेता आणि त्याला आव्हान देणारा, दोघेही भारतीय आहेत​. मग तुम्ही कुणाला पाठिंबा देणार​?

    हे म्हणजे आयपीएलची फायनल बघण्यासारखं आहे. मुंब​ई इंडियन्स​ जिंकले तेव्हाही आम्ही जल्लोष केला कारण एमआय म्हणजे घरचं कार्य​. पण चेन्न​ई सुपर किंग्ज जिंकले तेव्हाही आम्ही टाळ्या पिटल्या कारण सिएसके म्हणजे आमच्या माही भाईंची टीम​. एकूणात वर आणि वधू दोन्ही बाजूंनी आहेर मिळाल्यासारखं आहे. 😊


    पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे उद्गार ‘मन की बात‘ कार्यक्रमातील आहेत. जीएम विशी आनंद यांचे उद्धृत न्यूज 18 च्या अहवालातील आहे. जीएम हम्पी कोनेरू यांचे उद्गार चेसबेस इंडियाच्या मुलाखतीतील आहेत.


    1. याचं उत्तम उदाहरण म्हणजे युट्युबवर गाण्याखाली टाकलेल्या कॉमेंट्स​. कुणाला एखादं दु:खी गाण आवडतं कारत तिच्या रिझल्टची आनंदाची बातमी आली तेव्हा ते गाणं वाजत होतं. किंवा कुणाला एखादं आनंदी गाणं आवडतं कारण तिच्या दिवंगत आई किंवा बाबांना ते गाणं आवडायचं. युट्युब कॉमेंट्स समाजशास्त्रज्ञ आणि कथालेखक यांच्यासाठी नवीन कल्पनांचा खजिना आहे. ↩︎
    2. मी ऑल इंडिया रेडीओ ऐकत लहानाचा मोठा झालो. केबल टीव्हीपासून ओटीटीपर्यंत अनेक नवीन वेळखाऊ व्यवधानं आली पण तरीही शेवटी रेडीओ तो रेडीओच​. आजही लतादीदी, किशोरदा, रफी साहेब किंवा हेमंतदा यांचा आवाज न ऐकता एक-दोन दिवस गेले तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. ऑल इंडिया रेडीओची आणखी एक खासियत म्हणजे सीमेवरच्या जवानांसाठी प्रक्षेपित केले जाणारे विशेष कार्यक्रम​. स्मार्टफोन आणि जलद कनेक्टिव्हिटीच्या काळापूर्वी या शूर सैनिकांना कडक उन्हात किंवा शून्यापेक्षा कमी तापमानात दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करताना नागरी जगाशी रेडिओ हा एकमेव संबंध होता. ↩︎
  • पुणे पुस्तक महोत्सव २०२४

    पुणे पुस्तक महोत्सव २०२४

    पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे, शिवाय​ गेल्या शतकभरापासून विद्येचे माहेरघर​ म्हणून प्रसिद्ध आहे. आगामी काळात पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘पुणे लिट फेस्ट’ हे शहर आणि जनतेसाठी एक​ स्वतंत्र ओळख म्हणून उदयास येतील यात शंका नाही.

    आजच्या धावपळीच्या जगात लक्ष कमी झाल्यामुळे वाचन कसे कमी झाले आहे, अशा तक्रारी आपण अनेकदा ऐकतो. याउलट आपल्यातील आशावाद्यांना पुराव्याची गरज असेल तर ती १४ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पुण्यात झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाने दिली.

    महोत्सवाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी काही आकडे. हे महोत्सवाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकविक्रीत चौपटीने वाढ झाली आहे.

    आठवडाभरात विक्रमी दहा लाख पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट दिली. २.५ दशलक्षाहून अधिक पुस्तके विकली गेली आणि ४०० दशलक्ष रुपये (४.६ दशलक्ष डॉलर्स)ची गडगंज उलाढाल झाली. १०० हून अधिक नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आणि सुमारे १००० लेखकांनी या महोत्सवात भाग घेतला. ९७,०२० पुस्तकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पासह चार जागतिक विक्रम या कार्यक्रमात करण्यात आले.

    या व्याप्तीचा महोत्सव आयोजित करण्यासाठी सखोल नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे उत्स्फूर्त सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. महोत्सव यशस्वी करण्यामागे मुख्य आयोजक मा. श्री. राजेश पांडे जी, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील जी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ जी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे जी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक मा. श्री. युवराज मलिक जी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी जी यांचे अथक प्रयत्न होतेच त्याचबरोबर इतर अनेक व्यक्तींचा यात सहभाग होता, सर्वांची नावे जागेअभावी देणे शक्य नाही. विशेषकरुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत तत्पर असलेले तरुण विद्यार्थी स्वयंसेवक.

    पुणे पुस्तक महोत्सवात लेखकांशी चर्चा, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालचित्रपट महोत्सव असे अनेक समांतर उपक्रम आयोजित केले. मुलांशी संवाद साधण्यासाठी दुपारी शाळांकडून विशेष भेटीची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय स्वतंत्र खाना खजाना विभागही होता. शेकडो पुस्तके चाळून शिणलेल्या मेंदूला उर्जा देण्यासाठी विविध भारतीय पदार्थांची चव चाखता येत होती.

    एक मुलगा त्याच्या भूभूसोबत पुस्तक वाचतोय​. महोत्सवातील एक शिल्प​.

    पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे लिट फेस्ट’चे यंदाचे पहिले वर्ष होते. सगळ्या संत्रांना जायची इच्छा होती पण जमले नाही. मात्र भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मा. श्री. मुरलीकांत पेटकर जी यांचे प्रेरणादायक आणि प्रेरक सत्र ऐकू शकलो याचा आनंद आहे. पहिला ‘पुणे लिट फेस्ट’ तीन दिवसांचा होता आणि त्याला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता भविष्यात त्याचा कालावधी वाढणार यात शंका नाही.

    माझी एकच खंत आहे की अनेक मनोरंजक पुस्तके चाळायची राहून गेली असणार. पुस्तकांची प्रचंड संख्या बघता असे होणे साहजिकच होते. त्याचवेळी आपले आवडते लेखक आणि विषय आणि शैली शोधण्यासाठी तासनतास घालवणारे वाचक पाहून मनापासून आनंद झाला.

    मला जेवढा खजिना वाहून नेता येईल तेवढा खजिना घेऊन मी रोज परत आलो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ही सर्व पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढायचा हा यक्षप्रश्न आहे. 🙂

    पुणे पुस्तक महोत्सवात मिळालेला खजिना.

    आणि तरीही, महोत्सवातील सर्वात मौल्यवान वस्तू पुस्तके नव्हती; मात्र त्यांचा संबंध इतिहासाशी होता. पहिली वस्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री. मोरया गोसावी संस्थानला दिलेली १३ गावांमधील इनामाची सनद​.

    निश्चयाचा महामेरू ।
    बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारु ।
    श्रीमंत योगी ||

    श्री समर्थ रामदास स्वामी

    भारत इतिहास संशोधन मंडळाच्या स्टॉलमध्ये ही सनद मिळाली. त्याबरोबर आणखीही अनेक कागदपत्रांच्या प्रती होत्या, उदा. महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना लिहिलेले पत्र, अनेक पेशवेकलीन छायाचित्रे आणि पत्रे. या पत्रांचा मराठी अनुवाद भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे पुढल्या वर्षी प्रकाशित होणार आहे असे तिथल्या संचालकांकडून कळाले.

    दुसरा मौल्यवान ठेवा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची प्रतिमा. महोत्सवात राज्यघटनेचा एक स्वतंत्र स्टॉल होता जिथे भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत ठेवण्यात आली होती. विद्वानांच्या मसुदा समितीने १६५ दिवसांच्या कालावधीत तयार केलेला भारतीय राज्यघटना हा एक अनोखा कायदेशीर दस्तऐवज आहे. सुमारे १४५,००० शब्दांची ही राज्यघटना जगातील अलाबामाच्या घटनेनंतरचे दुसरी सर्वात दीर्घ सक्रिय राज्यघटना आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य पंडितांना लोकशाही म्हणून भारताच्या अस्तित्वाविषयी साशंकता होती.

    सर्व अडथळे झुगारून भारत सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या मुळाशी हे संविधान आहे, जे आता ७५ वर्षे जुने आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. पंतप्रधान मोदी जी यांनी नुकतेच संसदेत म्हटले होते की, “७५ वर्षांची कामगिरी सामान्य नाही, तर विलक्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतासाठी व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतांना पराभूत करून भारतीय राज्यघटनेने आपल्याला इथं आणलं आहे.”

    पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे, शिवाय​ गेल्या शतकभरापासून विद्येचे माहेरघर​ म्हणून प्रसिद्ध आहे. आगामी काळात पुणे पुस्तक महोत्सव आणि ‘पुणे लिट फेस्ट’ हे शहर आणि जनतेसाठी एक​ स्वतंत्र ओळख म्हणून उदयास येतील यात शंका नाही. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजकांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

    भारतीय महिला क्रिकेटची विजयी वाटचाल

    भारताने नुकतीच वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरूद्ध टी-२० मालिका २-१ अशी जिंकली.

    स्मृती मंधानाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९१ (१०२) धावा केल्या आणि एका वर्षात १००० पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. त्याआधी तिने टी-२० सामन्यांमध्ये ७६३ धावा केल्या आणि टी-२० फॉरमॅटमध्ये एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा केल्या. तिसऱ्या टी-२० सामन्यात रिचा घोषने १८ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारतीय संघाचे सर्वात जलद आणि संयुक्तपणे सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक झळकावले. आणि स्टंपच्या मागेही ती चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात रेणुकासिंग ठाकूरने उत्कृष्ट गोलंदाजी करत १० षटकांत २९ धावांत ५ गडी बाद केले. भारताने हा सामना विक्रमी २११ धावांनी जिंकला!

    जेमिमा रौड्रिग्ज, राधा यादव, प्रिया मिश्रा यांच्यासह भारतीय महिला क्रिकेट संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरचा अप्रतिम एकहाती ब्लाइंडर हे एक उत्तम उदाहरण.

    २०२५ मध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकासाठी हा संघ तयार आहे असं दिसतंय​.